ऑनलाईन सराव प्रश्नसंच ३३

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

1. विजय सकाळी सूर्यनमस्कार घालत असताना त्याची सावली कोणत्या दिशेला पडेल ?

पश्चिम
पूर्व
उत्तर
दक्षिण

2. रोशनचा रांगेत पुढून २५ वा क्रमांक व मागून पहिला क्रमांक असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती ?

२६
२४
२५
२७

3. दोन भावांच्या आजच्या वयात तीन वर्षांचे अंतर आहे. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज १३ वर्षे असल्यास लहान भावाचे आजचे वय किती ?

१० वर्षे
७ वर्षे
४ वर्षे
५ वर्षे

4. खालीलपैकी सन २०१३ या वर्षातील चुकीची तारीख कोणती ?

३१/१२/२०१३
३०/०९/२०१३
३१/०३/२०१३
२९/०२/२०१३

5. हापूस आंब्यापेक्षा केशर आंबा गोड आहे. तोतापुरी आंबा कलमी आंब्यापेक्षा गोड आहे परंतु हापूस आंब्याइतका गोड नाही, तर सर्वात गोड आंबा कोणता ?

हापूस
केशर
तोतापुरी
कलमी

6. ८ हा अंक एककस्थानी येणार्या १ ते १०० दरम्यानच्या संख्या किती आहेत ?

१८
१९
२१
१०

7. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते आहे ?

काटकोन त्रिकोणाचा एकच कोन काटकोन असतो
समभूज त्रिकोणाच्या तीनही बाजू समान असतात
विषमभूज त्रिकोणाच्या सर्व बाजू भिन्न असतात
विशालकोन त्रिकोणात दोन कोन विशालकोन असतात

8. एका कंपासची किंमत ३६ रुपये आहे राहुलने दुकानदाराला ९७२ रुपये देऊन काही कंपास विकत घेतल्या, तर राहुलने किती कंपास विकत घेतल्या असतील ?

३०
३५
२७
२२

9. एका चौरसाकृती बागेला कुंपण करण्यासाठी ५ रुपये प्रतिमीटर याप्रमाणे २४० रुपये खर्च आला तर त्या चौरसाकृती बागेची एक बाजू किती ?

४८ मी.
२४ मी.
१२ मी.
६ मी.

10. एका पुस्तक छपाई कारखान्यात पहिल्या दिवशी १२५०० मराठीची, दुसर्या दिवशी १०००० इंग्रजीची आणि तिसर्या दिवशी १३७५० गणिताची पुस्तके छापून तयार झाली. तर तीन दिवसात त्या कारखान्यात किती पुस्तके छापून तयार झाली ?

३५२५०
३६२५०
२२५००
३६७५०

11. खालीलपैकी कोणते लक्षण म्हातारपणाचे आहे ?

कानांनी नीट ऐकू न येणे
डोळ्यांनी स्पष्ट न दिसणे
स्मरणशक्ती कमी होणे
सर्व पर्याय बरोबर

12. ..... पर्वतातील 'कळसूबाई' हे सर्वात उंच शिखर आहे.

सातपुडा
हिमालय
भंडारदरा
सह्याद्री

13. सांडपाण्यामुळे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होत नाही ?

चिकणगुणिया
डेंगू
हत्तीरोग
कर्करोग

14. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील मिठागर आहे ?

डहाणू
पुणे
नाशिक
नागपूर

15. कांदा उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?

सातारा
पुणे
नागपूर
नाशिक

16. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना कशाचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली ?

फळांचे
तुरीचे
फटाक्यांचे
मिठाईचे

17. फिरंगोजी नरसाळा याला बादशाही चाकरीचे आमिष कोणी दाखवले ?

शायिस्ताखानाने
दिलेरखानाने
अफजलखानाने
औरंगजेबाने

18. शहाजीराजे यांचे निधन कोणत्या प्रसंगी झाले ?

घोड्यावरुन पडून
युद्धप्रसंगी
शिकारीच्या प्रसंगी
आजारपणात

19. गागाभट्टांचे घराणे कोठे स्थायिक झालेले होते ?

नाशिक
काशी
पैठण
पुणे

20. नोकरीवर ठेवताना शिवराय त्या व्यक्तीची खालीलपैकी कोणती बाब पाहत असत ?

धर्म
संपत्ती
योग्यता
सर्व पर्याय बरोबर